Posts

Showing posts from September, 2022

मौजे खालापुरी, ता. शिरूर कासार येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी"

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र , खामगाव (बीड -२) व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ सप्‍टेंबर रोजी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" कार्यक्रम मौजे खालापुरी , ता. शिरूर कासार येथे घेण्यात आला. सदरील गावातील श्री. रामकिशन परजने यांच्या ड्रॅगन फळाच्या बागेला तसेच कॅनोपी शेतकरी उत्पादित कंपनी ला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बीड , कृषी विद्यावेता , अंबेजोगाई , कार्यक्रम समन्वयक , विषय विशेषज्ञ (कृषि अभि.) , जिल्हा समन्वयक क्रॉपसँप , उपविभागीय कृषी अधिकारी तसेच वेगवेगळ्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी , कृषी विभागातील इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथील शेतकरी बांधवाशी संवाद

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथे शेतकरी बांधवाशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये  महाडीबीटी ,  रुंद वरंबा सरी वर सोयाबीन चे प्रात्यक्षिक पाहणी व व्यवस्थापन ,  शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. उपक्रमान्तर्गत श्री प्रभाकर रामराव नागरगोजे यांच्या  शेतीला भेट देऊन त्यांची पूर्ण माहिती घेण्यात आली.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी श्री महेश क्षीरसागर ,  विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आणि सहयोगी प्राध्‍यापक डॉ. टाकनखार व दवनगांव गावातील ७० पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव उपस्थित होते. सौजन्‍य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर

खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्राचा विविध गावात उपक्रम

Image
मौजे चुंबळी ता. पाटोदा , जि बीड येथे उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खामगांव ( बीड ) येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांनी दिनांक १ सप्‍टेंबर रोजी " माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या अभियाना अंतर्गत मौजे चुंबळी ( ता. पाटोदा जि. बीड ) येथे शेतक-यांशी संवाद साधला. कृषि विद्यापीठामध्ये संशोधित केलेले नवनविण तंत्रज्ञान , शासकीय योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शेतीतील अडचणी विषयी चर्चा करण्यात आली . या प्रसंगी विंचरणा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र , खामगाव , बीड चे कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर , पशुसंवर्धन विभागाचे प्रा. किशोर जगताप आदी   उपस्थित होते. मौजे बीड सांगवी ता. आष्टी जि. बीड येथे  उपक्रम अभियाना अंतर्गत मौजे बीड सांगवी ता. आष्टी जि. बीड येथे शेतकरी यांचे शी संवाद साधून त्यांना कृषि विद्यापीठ चे तंत्रज्ञान या बदल माहिती देण्यात आली. या भागातील मुख्य पिक कांदा असल्यामुळे शेतक-यांनी कांद्याची रोपे तयार केली. पाहणी केली असता जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. बुरश

मौजे नांदखेडा, करडगाव, हिंगला येथे विस्‍तार शिक्षण संचालनालयातील शास्‍त्रज्ञांची भेट

Image
मौजे नांदखेडा , करडगाव , हिंगला येथे विस्‍तार शिक्षण संचालनालयातील डॉ. पी. आर. देशमुख , डॉ. चिक्षे , श्री ढाकणे , श्री वल्लामवड , कृषि विभागातील कृषी सहायक श्रीमती एस. जी. चव्हाण भेट व मार्गदर्शन सोबत विनायक व संतोष मुंढे उपस्थित होते.

मध्‍यवर्ती रोपवाटीकेच्‍या वतीने मानवत तालुक्यातील मौजे रामेटाकळी येथे उपक्रम

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोपवाटीकेच्‍या वतीने दिनांक १ सप्टेंबर रोजी "एक दिवस माझ्या बळीराजा साठी" या अंतर्गत मानवत तालुक्यातील मौजे रामेटाकळी या गावी भेट दिली. गावातील प्रतिष्ठित नागरिक , प्रगतशील शेतकरी , अल्प भूधारक शेतकऱ्याच्या भेटी घेतल्या. ते वाफरत असलेले तंत्रज्ञान , पीक पद्धती , कृषी विभाग , कृषी विद्यापीठ यांचे मार्ग दर्शन याविषयी त्याचे मत जाणून घतले. त्याच्या समस्या विचारल्या. आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. सोयाबीन पीक परिस्थिती पाहिली. फळबाग , भाजीपाला लागवड , उत्पादन विषयी माहिती दिली.

मौजे येल्डा येथे अंबेजोगाई (जिल्हा बीड) विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राच्‍या वतीने उपक्रम

Image
  महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी अं बेजोगाई ( जिल्हा बीड ) अंतर्गत असलेल्‍या विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राच्‍या वतीने दिनांक ०१ सप्टेंबर   रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत अतिशय डोंगरी , दुर्गम भागात अतिशय हलक्या प्रतीची जमीन असलेल्या मौजे येल्डा ता. अंबेजोगाई येथे सौ. सुशीलाबाई मधुकर गडदे यांच्या शेतावर भेट देण्‍यात आली तसेच गावातील शेतकऱ्यांशी कृषि विषयक समस्‍यांवर चर्चा करण्यात आली. लाईट , पाणी व वन्यजीव प्राण्यांचा उपद्रव व इतर   या प्रमुख समस्या असल्याचे निदर्शनास आले. सौजन्‍य : डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी , विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जिल्हा बीड

मोरंबी ता.चाकूर येथे गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर येथील शास्त्रज्ञांची भेट आणि मार्गदर्शन

Image
माझा एक दिवस  माझ्या बळीराजासाठी मोहीमे अंतर्गत मौजे मोरंबी ता.चाकूर येथे गळीत धान्य संशोधन केंद्र  लातूर येथील  शास्त्रज्ञांची भेट आणि मार्गदर्शन

लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या उपक्रम

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान  महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक २ सप्टेंबर रोजी मौजे तिवटघाळ ( तालुका चाकुर ) येथील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. हेमंत पाटिल , डॉ   भास्कर आगलावे व डॉ राहुल चव्हाण यांनी सोयाबीन , कापुस , टोमैटो , सुर्यफूल , डाळींब , मुग आदी पिकावर येणाऱ्या कीड व रोग यावरील समस्या व त्यावरील उपाय व तसेच लागवड तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. या परिसरात सोयाबीन व   टोमेटो या पिकावर विषाणुजन्य रोग व रसशोषण करणाऱ्या   किडीचा प्रादुर्भाव आढळून आला त्यावर नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी बांधवाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून दुगधव्यवसाय ,   प्रक्रिया उद्योग , बचत गट , गटशेती ईत्यादी उपक्रम गाव पातळीवर राबविण

बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी दिली शेतकऱ्यांच्या बांधावर भेट

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्या समस्येचे निराकरण व्हावे या उद्देशाने कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने बदनापूर तालुक्यातील विविध शेतकऱ्यांना त्यांचा बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यातून होणारे नैराश्य व आत्महत्या यांची कारणीमांसा शोधून प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हे अभियान दिनांक ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय , बदनापूर येथील शास्त्रज्ञांच्या चमूने बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी दुधनवाडी व गेवराई बाजार येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन , तूर , कापूस ,  मोसंबी , केळी इत्यादी पिकांवरील कृषी विषयक अडचणी जाणून जाणून घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये कृषी महाविद्यालय बदनापूरचे प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे , कृषी संशोधन

अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय अंबाजोगाई , विभागीय कृषी विस्तार उपकेंद्र अंबाजोगाई व विभागीय कृषी कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर , परळी येल्ड , राक्षस वाडी आणि पठाण मांडवा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड , डॉ. मोहन धुप्पे , डॉ.वसंत सुर्यवंशी , डॉ. नरेशकुमार जायेवार या शास्त्रज्ञांनी तर उपविभागीय कृषी अधिकारी श्री वळखेलकर आदींनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी सोयाबीनवर व कापसावर असणाऱ्या कीड व रोगांच्या समस्या शेतकऱ्यांनी सांगितल्या त्या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन शास्त्रज्ञ चमूद्वारे करण्यात आले विशेषतः या परिसरात झालेल्या हुमणी किडीचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून भविष्यात विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे उत्पादन वृद्धिंगत करण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. कृषी विभाग

मौजे गलांडी (ता. औंढा नागनाथ, जिल्हा- हिंगोली) येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

Image
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार मा. कुलगुरू डॉ. इंद्र मणि व विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी.बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ हा उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तर्फे दि. एक सप्टेंबर रोजी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मौजे गलांडी ( ता. औंढा नागनाथ , जिल्हा- हिंगोली ) येथे सेंद्रीय शेती प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे ,  किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड , डॉ सुनिल जावळे आदींनी शेतकऱ्याच्या शेतावर भेट दिली , संपुर्ण दिवस शेतकरी कुटुंबासोबत राहून गावातील  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच तंत्रज्ञान विषयक घडी पत्रिकेचे वितरण केले व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

मौजे तादलापुर ता. उदगीर जि. लातूर येथील शेतकरी बांधवांशी संवाद

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे तादलापुर ता. उदगीर जि. लातूर येथे शेतकरी यांचेशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले.  यामध्ये पीक विमा योजना ,  क्रॉपसॅप अंतर्गत यलो मोझाक ,  खोडमाशी व इतर किडींची ओळख व व्यवस्थापन ,  रुंद वरंबा सरी वर सोयाबीन चे प्रात्यक्षिक पाहणी व व्यवस्थापन ,  शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली.  यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गावसाने ,  प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे ,  विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आदी उपस्थित होते. उपक्रमांर्गत साधारणत: १०० पेक्षा शेतकरी बांधवाशी संवाद साधला. सौजन्‍य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर

मानवत तालुक्‍यातील मौजे भोसा येथे शेतकरी बांधवाशी माननीय कुलगुरू यांचा संवाद

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजाच्‍या साठी उपक्रमांतर्गत दिनांक १ सप्‍टेबर रोजी मानवत तालुक्‍यातील मौजे भोसा शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते , मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर सरपंच श्री सुभाषराव जाधव ,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर ,  कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम ,  पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन योजनेचे प्रमुख डॉ हरीश आवारी ,  कृषि हवामान तज्ञ डॉ कैलास डाखोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की ,  कोणत्‍याही देशाची सुरक्षा ही अन्‍न सुरक्षेवरच अवलंबुन असुन देशातील अन्‍न सुरक्षा ही शेतकरी बांधवाच्‍या हाती आहे. त्‍यामुळे देशातील विकासाचा केंद्रबिंदु हा शेतकरीच असला पाहिजे. भारतीय समाजाची खरी संस्‍कृती ही खेडयातच दिसुन येते ,  देशातील खेडी समृध्‍द झाली पाहिजेत. ज्ञानामुळेच मानवाची प्रगती झाली ,  जास्‍तीत जास्‍त ज्ञान अवगत केले पाहिजे. शेतकरी बांधवांनी मुलांच्‍या जास्‍तीत जास्‍त शिक्षण देण्‍याकरिता आग्रही असले पाहिजे. प्रयोगशील शेती करीता कृषि तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असुन परभणी कृषी विद्यापीठ गांव

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची सुरुवात

Image
एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मराठवाडयातील ६० गावात शेतकरी बांधवासोबत महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण    मराठवाड्यात १ सप्टेंबर ते  ३०  नोव्हेंबर दरम्यान  ' माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी '  हा उपक्रम राबविण्यात येणार असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर ,  शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले ,  संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर ,  कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम ,  डॉ. सय्यद इस्माईल ,  प्राचार्य डॉ. उदय खोडके आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.  उपक्रमांच्‍या विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या पथकांच्‍या वाहनांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी हिरवा झेंडा दाखविला. ' माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी '  उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे ,  संशोधन केंद्रे ,  कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गावात जाऊन शेत