लातुर जिल्‍हयातील मौजे खुलगापुर येथील शेतकरी बांधवाशी संवाद

"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे खुलगापुर ता. लातूर जि. लातूर येथे ८० शेतक-याशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची आणि शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात  पिक विमा योजना, रुंद वरंबा सरी वर सोयाबीनची लागवड, रबी पिक नियोजन आणि शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. उपक्रमान्तर्गत श्री राजाभाऊ त्र्यम्बक रनखांब यांच्या  शेतीला भेट देऊन त्यांची पूर्ण माहिती घेण्यात आली. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बाबासाहेब ठोम्बरे व विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आदीसह कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच मौजे खुलगापुर आणि मौजे हनुमंतवाड़ी गावातील शेतकरी उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र